गुढकथा व रहस्यकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा वेगळ्या धाटणीतला हा एक कथासंग्रह आहे. भयकथा या कथा प्रकाराला सामाजिक भयाच्या माध्यमातून प्रदर्शित करणाऱ्या कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मतकरींनी तो अगदीच अलीकडच्या काळामध्ये लिहिलेला आहे. याच कारणास्तव आजच्या समाजरचनेमध्ये असलेल्या गुंतागुंती आणि भयाच्या भावना यातील कथांमधून प्रतीत होतात. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या घटना प्रत्येक कथेतील नायक हेरत असतो. आणि आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्यात यशस्वी होत नाही. त्याला खलनायक पुढील कोणतीही कृती करण्याच्या आधी संपवून टाकतात. अर्थात खरा रहस्यभेद होतच नाही. यातून तयार होते ती सामाजिक भयाची भावना. मतकरींच्या या कथासंग्रहातील कोणताच नायक 'जाऊ दे, आपल्याला काय करायचं?' असा प्रश्न विचारत नाही. तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला यश प्राप्ती होत नाही. म्हणजेच एका अर्थाने आजच्या कालखंडातील एकंदरीत भयाची परिस्थिती मतकरींनी या कथासंग्रहातील विविध कथांमधून मांडलेली आहे. विशेष म्हणजे गणेश मतकरी यांनी अतिशय सुंदर व सुटसुटीत प्रस्तावना लिहिली असल्याने कथासंग्रहाचा एकंदरीत साचा आपल्याला समजून येतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रातराणीचे रहस्य
महाराष्ट्रातील रहस्यकथाकारांच्या परंपरेत गुरुनाथ नाईक हे एक अग्रणी आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी रहस्यकथा वा...
-
तेहरानच्या जमिनीखाली साठ फूट खोल. एक अभेद्य, गुदमरवून टाकणारा आणि जगाच्या नजरेपासून पूर्णपणे लपलेला बंकर. बंकरच्या थंड, निर्जीव आणि ओलसर भिं...
-
भाग १ -> https://baburavramji.blogspot.com/2026/03/nemesis1.html भाग २ -> https://baburavramji.blogspot.com/2026/03/nemesis2.html वेळ:...
-
वेळ: पहाटे ३:५३. ठिकाण: सीन नदी, पॅरिस. पॅरिसवर धुक्याची एक ओलसर, जड चादर पसरली होती. चंद्राचा प्रकाश त्या धुक्याला भेदून खाली येऊ शकत नव्ह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा